ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी टीम इंडियाकडून स्मृती मांनधना आणि प्रतिका रावलने चांगली सूरूवात केली होती. दोघींमिळून 155 धावांची पार्टनरशीप केली होती.या दरम्यान स्मृती मंधाना 80 धावा करून बाद झाली होती. या खेळीत तिने 3 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. स्मृतीच शतक हुकलं त्यामुळे प्रतिका रावल तरी शतक ठोकेल अशी आशा होती पण ती देखील 75 धावांवर बाद झाली.या दरम्यान तिने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.
advertisement
हे दोन्ही खेळाडू जेव्हा मैदानात होते तेव्हा भारताच स्कोर 200 च्या नजीक होता. त्यानंतर हरलीन देओलने 38 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 धावा, जेमीमा रॉड्रीक्सने 33 धावा, रिचा घोषने 32 धावा, अमनज्योत कौरने 16 धावा केल्या होत्या.बाकी इतर खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले.
खरं तर टीम इंडिया चांगल्या स्थितीत खेळत होती पण शेवटच्या क्षणी 36 धावांमध्ये 6 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारताचा डाव 48.5 ओव्हरमध्ये 330 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे टीम इंडियाला ही चूक महागात पडू शकते.
ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सुथरलँडने 5 विकेट घेतल्या होत्या. तर सोफीने 3 आणि मेगन स्कट आणि अॅश्ले गार्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचे आव्हान आहे.आता ऑस्ट्रेलिया हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.