रायुडूने ऋतुराज गायकवाडला सल्ला दिला आहे की, त्याने थोडी हिम्मत दाखवून धोनींना विचारायला हवे की,‘तू वरच्या क्रमांकावर फलंदाजी कराल का?’ कारण धोनी अद्यापही शानदार फॉर्ममध्ये आहे आणि संघासाठी मॅच फिनिश करण्याची त्याची क्षमता अफाट आहे.
मुंबई इंडियन्ससाठी जागे होण्याची वेळ; पुढची मॅच KKR विरुद्ध, हरले तर...
धोनीने नवव्या क्रमांकावर येणे योग्य होते का?
advertisement
CSK आणि RCB यांच्यातील सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मॅच चेन्नईच्या हातातून गेली होती. धोनीने त्या सामन्यात काही मोठे शॉट खेळले होते. तरीही त्याला एवढ्या खालच्या क्रमांकावर पाठवणे हे चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना फारसे पटले नाही.
रायुडूने दिला हा मोठा सल्ला
अंबाती रायुडूच्या मते, धोनीच्या फलंदाजीवर संयम ठेवणे संघासाठी चुकीचे ठरू शकते. त्याने गायकवाडला सल्ला दिला की, "कर्णधार म्हणून ऋतुराजने धोनींना सांगायला हवे की, कृपया वरच्या क्रमांकावर फलंदाजी करा, त्याचा संघाला मोठा फायदा होईल.
लाडक्या मुलीच्या शिक्षणासाठी किती fees भरतो धोनी? प्रसिद्ध शाळेत जाते झिवा
आयपीएल 2025मध्ये धोनीने पहिल्या दोन सामन्यात विकेटच्या मागे धमाकेदार कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात तो फलंदाजीला आला आणि दोन चेंडू खेळले पण धावा केल्या नाहीत. तेव्हा देखील धोनी फलंदाजीला यावा म्हणून जडेजा बाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या लढती जेव्हा आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तेव्हा धोनी थोड्या वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येईल असे वाटले होते. पण वरचा क्रमांक सोडा धोनी नेहमी ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्या क्रमांकावर देखील आला नाही. आर अश्विन बाद झाल्यानंतर धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे धोनी आणि चेन्नई संघाबद्दल बोलण्याची रायडूची ही पहिली वेळ नाही. याआधी धोनी फलंदाजीला यावे म्हणून आपल्याच संघातील फलंदाज बाद व्हावा अशी मागणी चाहते करत असतात. इतकच नाही तर फलंदाज बाद झाल्यानंतर चाहते आनंद व्यक्त करतात कारण धोनी फलंदाजीला येणार असतो, ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली नाही असे रायडू म्हणाला होता.