
जालना : प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी पान खाल्ले जाते. पानाला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्व आहे. शुभविवाह असो की शुभकार्ये पान लागतेच लागते. परंतु, या पानाची शेती कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचीच शेती जालन्यातील प्रयोगशील शेतकरी मंगेश बेराड यांनी केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.