जालना: शेती हा तोट्याचा व्यवसाय म्हणून सर्वजण शेतीला हिनवत असतात, परंतु शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल केल्यास ती आर्थिक भरभराट आणणारी ठरू शकते. जालन्यातील सिंधी काळेगाव येथील गणेश वाघ या सर्वसाधारण शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले. शेडनेट शेतीच्या माध्यमातून वर्षाला 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला त्यांनी आपल्या शेतावरच बांधला. पाहुयात या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा.