बीड : आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात मोबाईलचा वापर आवश्यक झाला आहे. परंतु या आवश्यकते पलीकडे जाऊन मोबाईलचा अतिरेकाने वापर होत असल्याचे चित्र समाजात दिसू लागले आहे. विशेषतः तरुणाई आणि विद्यार्थ्यांमध्ये दिवसाला सात-आठ तासांहून अधिक मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.