
धाराशिव: चहा हे जणू भारतीयांचं राष्ट्रीय पेय आहे. आपल्याकडे चहाशिवाय सहसा कुणाची सकाळ होतच नाही. परंतु, शुगर आणि इतर आजारांमुळे अनेकदा साखरेचा चहा पिणं बंद करावं लागतं. मात्र, गुळाचा आरोग्यदायी चहा आपण ट्राय केला तर आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत. दूध आणि साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीर ठरतोय असे विविध अभ्यासातून समोर आले आहे. याबाबतच धाराशिव येथील आहार तज्ज्ञ डॉ. चेतन बोराडे यांनी माहिती दिली आहे.