TRENDING:

VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी! गोव्याच्या किनाऱ्यावर पापलेटची पर्वणी

गोवा

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग : एकीकडे पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. खराब हवामान आणि चक्रीवादळाची स्थिती असल्याने मच्छीमारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गोव्यातील हरमल समुद्र किनाऱ्यावर पॉपलेट, सुरमई माशंचा बम्पर कॅच (माशंचा खच) सापडल्याने खवय्यांची चांगली सोय झाली आहे.

Last Updated: September 28, 2024, 15:09 IST
Advertisement

भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

छत्रपती संभाजीनगर : उद्या कार्तिकी एकादशी आहे. एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या उपवासाला आपण सर्वजण साबुदाणा खिचडी किंवा भगर खातो. यामध्ये भगर खाण्याचे शरीराला भरपूर फायदे भेटतात. भगरमधून आपल्याला प्रोटीन, फायबर मिळतात. त्यासोबत अजून असे खूप फायदे आहेत. त्यामुळे भगर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Last Updated: October 31, 2025, 20:15 IST

कार्तिकी एकादशीला बनवा मोकळी, मऊ साबुदाणा खिचडी; चिकट होणार नाही! Recipe

मुंबई : उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वड्यांचा बेत केला जातो. १ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी उपवास पाळणार असाल तर साबुदाणे खिचडीची सोपी रेसिपी पाहूया. ज्यामुळे खिचडी चिकटही होणार नाही आणि कच्चीही राहणार नाही. गृहिणी छाया शिंदे यांनी ही खमंग साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: October 31, 2025, 19:42 IST
Advertisement

सोलापूरच्या या गावात चुकूनही तोडत नाहीत कडूलिंबाचं पान, कारण काय तर

सोलापूर : कडूलिंबाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असतं. कडूलिंबाची पानं तर प्रचंड आरोग्यपयोगी मानली जातात. परंतु सोलापुरातील एका गावात मात्र अजब प्रथा आहे. इथं कडूलिंबाची झाडं असूनही लोक त्यांचं एक पानही तोडत नाहीत. बरं, झाडं वाचवणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे यामागचं उद्दिष्ट नाहीये. तर, यामागे आहे धार्मिक मान्यता.

Last Updated: October 31, 2025, 19:22 IST

'या' गावाला म्हणतात 'पांडवांची पोफळी', इथं खरंच आले होते का पांडव?

सोलापूर : जिल्ह्यात शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर पोफळी गाव आहे. या गावात धर्मराजा यांचं मंदिर असून गावाला 'पांडवांची पोफळी' म्हटलं जातं. इकडं जो कुणी येतो त्याला गावाला हे असं नाव का दिलं असेल बरं, खरंच इथं पांडव आले होते का? असा प्रश्नच पडतो. याबाबत सांगितली जाते एक खास आख्यायिका.

Last Updated: October 31, 2025, 19:03 IST
Advertisement

मुंबईत मिळतोय विदर्भ वडापाव! खवय्यांच्या लागतायेत रांगा, काय आहे खास?

Food

मुंबई : महाराष्ट्रात जशी बारा मैलांवर भाषा बदलते तशी तेथील खाद्य संस्कृतीही बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी खाद्य संस्कृतीही आहे. मुंबईची खास ओळख असलेल्या वाडापाव पैकी एक म्हणजे विदर्भ वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहिला मिळते. या ठिकाणी 20 रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात.

Last Updated: October 31, 2025, 18:31 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/गोवा/
हा VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी! गोव्याच्या किनाऱ्यावर सुरमाई आणि पापलेटची पर्वणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल