कोल्हापूर: योगा ही भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. गेल्या काही काळात भारतीय लोक यापासून दूर जात आहेत. पण धकाधकीचं जीवन आणि आरोग्याकडे दुर्लक्ष शरीरासाठी भारी पडू लागलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडलं गेलं पाहिजे आणि योगाला जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनवायला हवा. एकंदरीतच योगामुळे आपल्य आयुष्यात नेमका कोणता फरक पडतो? हे कोल्हापुरातील योगा एक्सपर्ट स्नेहा छाब्रिया यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं.