
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावर कैद झाली. शिवनी येथून नवरगावकडे एका चारचाकी वाहनाने काही लोक जात असताना त्यांना पुलावर वाघ उभा असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी चार चाकी गाडी तिथेच थांबवली. मात्र त्याचवेळी मागून एक भरधाव दुचाकी पुलाकडे निघाली. दुचाकीस्वारांना तिथे वाघ असल्याचे लक्षात आले नाही. दुचाकी अगदी जवळ आल्यावर वाघाने हल्ल्याचा पवित्रा घेतला मात्र दुचाकी वेगात असल्याने तिथून पुढे निघून गेली. ही सर्व घटना चारचाकी मध्ये बसलेल्या लोकांनी मोबाईल मध्ये चित्रित केली ती समाज माध्यमावर वायरल झाली आहे.
Last Updated: October 06, 2025, 12:00 ISTलग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 10, 2025, 13:43 ISTचांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 ISTअमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
Last Updated: December 09, 2025, 17:50 ISTपुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
Last Updated: December 09, 2025, 16:55 ISTछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील एजास शेख यांचा वडिलोत्पार्जित म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय काही कारणास्तव काही काळाने बंद झाला होता. हिंम्मत न हारता आवड म्हणून गेल्या दोन वर्षांपासून एजास म्हैसपालन आणि दुग्ध व्यवसाय नियोजित पद्धतीने पुढे नेत आहे. सुरुवातीच्या काळात दोन म्हशी खरेदी केल्या त्यांच्यापासूनच या व्यवसायामध्ये वाढ होत गेली आणि आजच्या घडीला 7 म्हशी आहेत.
Last Updated: December 09, 2025, 16:32 IST