
मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. असे प्रकार करायचे असतील तर निवडणुक घेता कशाला असं त्या संतापाने म्हणाल्या आहेत.
Last Updated: Jan 15, 2026, 18:39 ISTईव्हीएम मशीन स्ट्राँग रुम मध्ये घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीचा पाठलाग केला. कोणत्याही प्रकारे घोळ होऊ नये म्हणून ते गाडीच्या पाठीमागून सुरक्षेसाठी गेले.
Last Updated: Jan 15, 2026, 21:30 ISTउल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन निवडणुक कर्मचारी बाईक वरुन नेताना सर्वपक्षीय उमेदवारांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि रोखलं. पोलिसांना समजल्यावर त्यावर योग्य कारवाई केरणार आहेत.
Last Updated: Jan 15, 2026, 21:18 ISTआज लोकशाहीच्या या उत्सवात आनेक ठिकाणी गालबोट लागल्याचे दिसून आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये पैसे वाटप झाल्याचे समजल्यावर ते तिथे गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला.
Last Updated: Jan 15, 2026, 20:56 ISTअनेक ठिकाणी मतदान यादीत घोळ झाल्याचं महाराष्ट्राच्या या आजच्या मतदानादरम्यान झालं. तसेच चक्क वन मंत्री गणेश नाईकांचंच यादीतून नाव गायब झाले. त्यांमुळे सामान्य नागरिकांचं किती हाल होऊ शकतात हे दिसून आले. त्यावरुन आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. तसेच गणेश नाईकांनी सिस्टीम अपयशी झाल्याचे म्हटले आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 20:40 ISTमहाराष्ट्रात मतदानादरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले. या सगळ्यात काही ठिकाणी गोंधळ तर काही ठिकाणी राडा झाला.
Last Updated: Jan 15, 2026, 20:23 IST