मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तब्बल पाच तास वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे एका अॅम्ब्युलन्समध्ये अडकलेल्या दीड वर्षांच्या चिमूकल्याचा जीव गेला. वेळेत रुग्णालय गाठता न आल्याने या बालकाने जीव गमावल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचे संकट पुन्हा अधोरेखित करणारी ही घटना नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरली आहे