
महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दु:ख सावरता आलं नाही. अशातच मिटकरी यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला.