मुंबई: सध्या श्रावण महिना सुरू आहे. हा महिना उपवास आणि व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय सध्या तरुणाईमध्ये इंटरमिटंट फास्टिंगचा ट्रेंड देखील सुरू आहे. अनेकांचा असा समज आहे की, ज्या व्यक्ती कष्टाची कामं करत नाहीत त्यांनीच उपवास केला पाहिजे. ज्या व्यक्ती सतत कामाच्या धावपळीत असतात अशांनी उपवास केला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा फक्त एक गैरसमज आहे. उपवास हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरणारा पारंपरिक उपाय आहे.