TRENDING:

थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक, घरच्या घरी बनवा करडईची भाजी, संपूर्ण रेसिपी Video

मुंबई : सध्या सर्वत्र थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक असं काही घरच्या घरी बनवायचे असेल तर करडईची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त थंडीच्या दिवसात उपलब्ध असणारी ही भाजी फार चविष्ट होते. करडईच्या भाजीची रेसिपी कशी करायची? याबद्दलच आपल्याला मुंबईतील गृहिणी रानु रोहोकले यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 25, 2025, 18:18 IST
Advertisement

सकाळी घरातून नाश्ता न करता बाहेर पडतायत? आधी 'ही' सवय मोडा; नाहीतर होवू शकतात विपरीत परिणाम Video

कोल्हापूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बरेचजण सकाळी गडबडीने घरातून कामाला जायला बाहेर पडतात. अशावेळी कित्येकदा नाश्ता करणे राहून जाते. पण अशा परिस्थितीत खाण्या पिण्याची अयोग्य सवय आणि व्यस्त जीवनशैली याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात. कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सकाळी नाश्ता करण्याबद्दल माहिती दिली आहे.

Last Updated: November 25, 2025, 19:20 IST

लग्नकार्यात गोंधळ का घालतात? जाणून घ्या खरं कारण, Video

वर्धा :लग्नकार्याच्या शुभप्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. ज्या घरी लग्नकार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि खंडोबाचा जागर हा केलाच जातो. महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपापल्या सोयीनुसार दिवस ठरवून गोंधळ घातला जातो. काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. मात्र महाराष्ट्रात गोंधळाची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? आणि लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याचं नेमकं काय महत्त्व असतं? यासंदर्भात वर्धा येथील गोंधळी राजीव कानडे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.

Last Updated: November 25, 2025, 18:36 IST
Advertisement

ना खत, ना औषध! फक्त नैसर्गिक साहित्यातून होतेय १०० टक्के यशस्वी शेती; 'झिरो बजेट' शेतीचा फॉर्म्युला काय? Video

Success Story

शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते. प्रसिद्ध कृषी तज्ञ सुभाष पालेकर यांनी या संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पद्धतीचा उद्देश एकच, शेतकरी कर्जमुक्त होऊन स्वतःच्या नैसर्गिक संसाधनांमधूनच शेती करावी आणि आत्मनिर्भर व्हावा. मातीची सुपीकता राखत नैसर्गिक परिसंस्था टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न अनेक राज्यांमध्ये यशस्वी होताना दिसत असल्याची माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.

Last Updated: November 25, 2025, 17:45 IST

वाचाल तर वाचाल! डोईफोडे दाम्पत्याने वाचनप्रेमींसाठी सुरू केले फिरते ग्रंथालय; कुठे सुरू आहे हा उपक्रम?

मुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.

Last Updated: November 25, 2025, 17:18 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक, घरच्या घरी बनवा करडईची भाजी, संपूर्ण रेसिपी Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल