
पनवेल - सीएसएमटी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पनवेल-सीएसएमटी प्रवासादरम्यान महिलांच्या डब्ब्यात एक 50 वर्ष वयाचा पुरुष चढला होता. तेव्हा एका 18 वर्षाच्या तरुणीने त्याला महिलांच्या डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. पण, दोघांमध्ये वाद झाला आणि या इसमाने तरुणीला धावत्या लोकलमधून खाली फेकलं. या अपघातात तरुणीच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर जखम झाली.डब्यातील महिलांनी ही माहिती पोलिसांना कळवली.त्यानंतर खांदेश्वर स्टेशनला या आरोपीला सीआरपीएफ जवानांनी पकडलं. या जखमी तरुणीचं नाव श्वेता असं आहे, तर आरोपीचं नाव शेख नवाज आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated: Dec 22, 2025, 18:33 ISTसांगलीच्या खानापूर तालुक्यातील भावळणी येथे एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली.हा स्फोट इतका मोठा होता की आवाजाने भावळणी गाव आणि आसपासचा 5 किलोमीटर परिसर हादरला. स्फोट झाल्यावर तेथील आसपास असलेल्या वाहनांच्या काचांना तडे गेले.तर गावातील घरांमधील कपाटे आणि भांडी खाली पडली.यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.या घटनेनंनतर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले. अफ्ताफ मन्सुर मुल्ला आणि अमिन मुल्ला अशी जखमी इसमांची नावे आहेत.तेथील विटानगर परिषद आणि खानापूरच्या अग्निशमन दलाने वेळीच येऊन ही आग आटोक्यात आणली.
Last Updated: Dec 22, 2025, 20:25 ISTकल्याण : मार्गशीर्ष महिन्याचे उपवास संपले की नॉनव्हेज प्रेमींना चिकन मटण खाण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. पण नेहमीच चिकन, मटण खाऊन बोर झाला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही घरीच स्पेशल गार्लिक चिकन करू शकता. चला तर जाणून घेऊयात चमचमीत गार्लिक चिकन साधी आणि सोपी रेसिपी
Last Updated: Dec 22, 2025, 19:44 ISTअमरावती : हिवाळ्यात अनेक पौष्टिक पदार्थ आणि साहित्य आहारात घेतले जातात. त्यातीलच एक म्हणजे मध. हिवाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक त्रासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मध उपयुक्त ठरते. तसेच हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला देखील यामुळे कमी होतो. मध खाण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. ते आपण जाणून घेऊया.
Last Updated: Dec 22, 2025, 17:41 ISTकल्याण : हिवाळा सुरू झाला की केळीचा हंगाम सुरू होतो. त्यातच बाजारात केळफूल मिळते मिळते. केळफुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळफूलात भरपूर फायबर, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे असल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, हिमोग्लोबिन वाढते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मासिक पाळीतील समस्या आणि वेदना कमी होतात. ही भाजी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात या फुलांना मागणी असते. केळफुलाची भाजी कशी बनवायची पाहुयात.
Last Updated: Dec 22, 2025, 16:10 IST