भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा अखेर बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्यावर हल्ला केला आहे. एकूण 9 ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून पहलगाम हल्ल्याचा कट रचला त्याच ठिकाणी भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करून हल्ला केला आहे. या हल्ल्यात 12 दहशतवादी ठार झाले आहे, तर 55 दहशतवादी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.