
सोलापूर: शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे,तर गिर गायीच्या दूध, तूप आणि शेणखत विक्रीतून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.
Last Updated: November 25, 2025, 15:12 ISTवर्धा :लग्नकार्याच्या शुभप्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. ज्या घरी लग्नकार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि खंडोबाचा जागर हा केलाच जातो. महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपापल्या सोयीनुसार दिवस ठरवून गोंधळ घातला जातो. काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. मात्र महाराष्ट्रात गोंधळाची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? आणि लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याचं नेमकं काय महत्त्व असतं? यासंदर्भात वर्धा येथील गोंधळी राजीव कानडे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.
Last Updated: November 25, 2025, 18:36 ISTमुंबई : सध्या सर्वत्र थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक असं काही घरच्या घरी बनवायचे असेल तर करडईची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त थंडीच्या दिवसात उपलब्ध असणारी ही भाजी फार चविष्ट होते. करडईच्या भाजीची रेसिपी कशी करायची? याबद्दलच आपल्याला मुंबईतील गृहिणी रानु रोहोकले यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 25, 2025, 18:18 ISTशेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते. प्रसिद्ध कृषी तज्ञ सुभाष पालेकर यांनी या संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पद्धतीचा उद्देश एकच, शेतकरी कर्जमुक्त होऊन स्वतःच्या नैसर्गिक संसाधनांमधूनच शेती करावी आणि आत्मनिर्भर व्हावा. मातीची सुपीकता राखत नैसर्गिक परिसंस्था टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न अनेक राज्यांमध्ये यशस्वी होताना दिसत असल्याची माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
Last Updated: November 25, 2025, 17:45 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 17:18 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 16:45 IST