उत्तर प्रदेश प्रदेशातील ही घटना आहे. हाथरस येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या. त्यांच्या शहरापासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला त्या पोहोचल्या. त्याच रात्री मालगाडीचा गार्ड रवनीत आर्यची इटावा स्टेशनवर ड्युटी होती. ड्युटीसाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅसटवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या दिसल्या.
मध्यरात्री 3 वाजता रेल्वे स्टेशनवर होते 2 तरुण; GRP ने तपास करताच समजलं ते शॉकिंग
advertisement
कोण होत्या त्या मुली?
रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की, गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली. त्यांना काही मदत हवी का म्हणून विचारलं. एका मुलीनं सांगितलं की, ती हाथरसची रहिवाशी आहे. एका ट्युशन सेंटरमधून परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले. ती खूप घाबरली आणि हातरस स्टेशनवर पोहोचली. स्वतःला वाचवण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन काही मिनिटांत तिथून निघाली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कुठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांनाही समजलं नाही.
गार्डनं मुलींसोबत काय केलं?
आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, 'ट्रेन छोट्या स्टेशनवर थांबली पण त्या मुली उतरल्या नाही. कारण काही प्रवाशांनी त्या मुलींना इटावा इथं उतरण्याचा सल्ला दिला, जे एक मोठं स्टेशन आहे आणि प्रवाशांची चांगली सोय आहे. इटावा जंक्शनवर उतरल्यानंतर त्या कोणाशीही बोलायला घाबरत होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एका बाकावर पूर्णपणे शांत बसल्या होत्या.
ट्रेन गार्डचं लक्ष या मुलींकडे गेलं. त्यानं त्यांना स्टेशन अधीक्षकांकडे नेलं. त्यांनी रेल्वे पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलायला सांगितलं. यानंतर या मुलींची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून आणली.
