केरळ हे राज्य भारतात सर्वाधिक सापांच्या प्रजातींसाठी ओळखलं जातं. मात्र, याच्या अगदी उलट एक असा भागही भारतात आहे, जिथे एकही साप सापडत नाही. ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे खरं आहे.
भारतासारख्या देशात दरवर्षी सर्पदंशामुळे अनेक लोकांचे प्राण जातात. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात, लोकांना सापांचा मोठा धोका असतो. कलाच, चंद्रबोर, केउते आणि गोखरू हे चार विषारी साप देशभरात सामान्यपणे आढळतात. याशिवाय शंखचूड आणि शंखमुटी सारखे सापही खूपच घातक मानले जातात.
advertisement
अलीकडे, 'येलो बेली सी स्नेक' नावाच्या सापानेही चिंता वाढवली आहे. मूळतः अरबी समुद्रात आढळणारा हा साप दीघा समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला होता. तज्ज्ञांच्या मते, तो भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपेक्षा अधिक घातक आहे.
पण या सगळ्यात लक्षद्वीप हे एकमेव असे केंद्रशासित प्रदेश आहे, जे संपूर्णपणे सापमुक्त आहे. लक्षद्वीप हे 36 लहान बेटांचे समूह असून यापैकी केवळ 10 बेटांवरच लोकवस्ती आहे. या बेटांमध्ये कवरत्ती, अगत्ती, अमिनी, कदमत, किलाटन, चेतलाट, वित्रा, अंदोह, कालापानी आणि मिनिकॉय यांचा समावेश होतो.
लक्षद्वीपची लोकसंख्या सुमारे 64,000 असून त्यातील 96% लोक मुस्लिम धर्मीय आहेत. या बेटांचा एकूण विस्तार केवळ 32 चौरस किलोमीटर आहे. विशेष म्हणजे, काही बेटांवर तर 100 पेक्षा कमी लोक राहतात.
या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लक्षद्वीपमध्ये एकही साप आढळत नाही. केवळ सापच नाही, तर येथे कुत्रे देखील आढळत नाहीत. लक्षद्वीप प्रशासन हा परिसर साप आणि कुत्रेमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यटकांनाही बेटांवर कुत्रे आणण्याची परवानगी दिली जात नाही.
या बेटांवर साप आणि कुत्रे नसले तरी, इथे मोठ्या संख्येने पक्षी, विशेषतः कवळ्या आढळतात. पिट्टी बेट हे पक्ष्यांचं अभयारण्य मानलं जातं. याशिवाय, येथे 'सिरेनिया' किंवा 'समुद्री गाय' नावाचा दुर्मिळ प्राणीही पाहायला मिळतो, ज्यामुळे लक्षद्वीप आणखीनच खास ठरतं.