BhauBeej 2025: भाऊबीज-यमद्वितियेचा असा संबंध! बहिणीच्या घरी जाऊनच का ओवाळून घ्यावं?

Last Updated:

BhauBeej 2025: भाऊबीजेचा सण हा भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेम, स्नेह आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो, ज्याला भ्रातृ द्वितीया किंवा यमद्वितीया असंही म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये याचा विशेष उल्लेख आढळतो..

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात भाऊबीजेचा सण हा भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेम, स्नेह आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो, ज्याला भ्रातृ द्वितीया किंवा यमद्वितीया असंही म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये याचा विशेष उल्लेख आढळतो, विशेषतः पद्म पुराणमध्ये याचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. पौराणिक मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी भोजन करण्याचे विधान आहे. या संदर्भात अशी श्रद्धा आहे की, जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी भोजन स्वीकारतो, त्याला यमराज देखील त्रास देत नाहीत, म्हणजेच त्याला अकाली मृत्यूचे भय राहत नाही. त्यामुळे, या दिवशी बहिणीच्या घरी भोजन करणे का महत्त्वाचे मानले जाते आणि याबद्दल शास्त्रांमध्ये काय सांगितले आहे, ते जाणून घेऊया.
यमुना आणि यमराजाची कथा -
धार्मिक कथेनुसार, याच दिवशी यमुनेने तिचा भाऊ यमराजाला घरी भोजनासाठी आमंत्रित केले होते. यमराजाने भोजन ग्रहण केल्यानंतर यमुनेकडून रक्षासूत्र बांधून घेतले आणि त्या बदल्यात तिला हा वर दिला की, जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी भोजन करेल, त्याला दीर्घायुष्य, समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून भाऊबीजेचा हा पारंपरिक उत्सव साजरा केला जाऊ लागला.
advertisement
भाऊबीजेला बहिणीच्या घरी भोजन का आवश्यक - या दिवशी व्यक्तीने स्वतःच्या घरी भोजन न करता, बहिणीच्या घरी स्नेहभोजन करावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असं केल्यानं जीवनात कल्याण, सौभाग्य आणि उन्नतीचे योग जुळतात. भोजनानंतर बहिणींना सन्मानपूर्वक भेटवस्तू, वस्त्र किंवा दागिने देणे शुभ मानले जाते.
advertisement
सख्खी बहीण नसल्यास काय करावे - जर एखाद्या व्यक्तीला सख्खी बहीण नसेल, तर तो आपल्या चुलत, मावस किंवा कोणत्याही मित्राच्या बहिणीला बहीण मानून हा सण साजरा करू शकतो. पद्म पुराणानुसार, जो व्यक्ती आपल्या विवाहित बहिणीला वस्त्र, दागिने किंवा इतर भेटवस्तू देतो, तो वर्षभर कोणत्याही वाद किंवा भयापासून मुक्त राहतो. धार्मिक मान्यता अशीही आहे की, ज्या भावाने भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीच्या हातचे भोजन केले, त्याला केवळ धन आणि यश प्राप्त होत नाही, तर त्याच्या जीवनात सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य देखील टिकून राहते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
BhauBeej 2025: भाऊबीज-यमद्वितियेचा असा संबंध! बहिणीच्या घरी जाऊनच का ओवाळून घ्यावं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement