Pitrudosh: तीन पिढ्यांमध्ये घरात अशी घटना घडल्यास त्रिपिंडी श्राद्ध करावं; अडचणींच्या मुळावर घाव

Last Updated:

Tripindi puja ke fayde​ : अकाली मृत्यू झालेल्या किंवा ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, अशा अतृप्त आत्म्यांच्या शांतीसाठी हा विधी केला जातो. असे आत्मे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे आणू शकतात, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई​ : आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही. घरात विनाकारण तणाव असतो किंवा आरोग्य बिघडत राहते. अनेक लोक ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतात आणि तिथूनच कळते की, काही पितृदोषांमुळे जीवनात अडचणी येत आहेत. पितृदोष म्हणजे पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा किंवा त्यांच्या अंत्यसंस्कारात कोणतीही चूक होणं. त्यांना शांत करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. याबाबत ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ.
त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे ज्या मृतात्म्यांचे श्राद्ध (पितरांसाठी केले जाणारे विधी) सलग तीन वर्षे केले जात नाही, अशा अतृप्त आत्म्यांच्या शांतीसाठी केलेला विधी. याला 'काम्य श्राद्ध' असेही म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती अकाली किंवा अपघाती मृत्यू पावते, तेव्हा तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, अशावेळी त्यांच्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.
त्रिपिंडी श्राद्धाचे महत्त्व आणि कारणे -
ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो, त्यांना त्रिपिंडी श्राद्ध करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी येते. अकाली मृत्यू झालेल्या किंवा ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, अशा अतृप्त आत्म्यांच्या शांतीसाठी हा विधी केला जातो. असे आत्मे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे आणू शकतात, असे मानले जाते. त्रिपिंडी श्राद्धामध्ये तीन पिढ्यांच्या (वडील, आजोबा आणि पणजोबा) पितरांना तर्पण आणि पिंडदान केले जाते. यामुळे सर्व पितरांना मोक्ष मिळतो. घरात सतत होणारे वाद, शांततेचा अभाव, व्यवसाय किंवा नोकरीतील अडथळे, विवाह न होणे किंवा संतती प्राप्तीमध्ये येणाऱ्या समस्या यांसारख्या अडचणी दूर करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध उपयुक्त मानले जाते.
advertisement
त्रिपिंडी श्राद्ध कधी करतात?
श्राद्ध पक्ष, अमावस्या, पौर्णिमा, तसेच शुक्ल आणि कृष्ण पक्षातील पंचमी, अष्टमी, एकादशी, चतुर्दशी यांसारख्या तिथींना त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. जेव्हा सूर्य कन्या किंवा तूळ राशीत असतो (१६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान), तो काळ त्रिपिंडी श्राद्धासाठी अधिक शुभ मानला जातो, कारण या काळात पितर पृथ्वीवर अधिक मोकळेपणाने भ्रमण करतात, असे मानले जाते.
advertisement
त्रिपिंडी श्राद्ध करण्याची पद्धत -
त्रिपिंडी श्राद्ध एका योग्य आणि अनुभवी पंडिताच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. यात साधारणपणे खालील विधींचा समावेश होतो:
सर्वप्रथम पवित्र कलशाची स्थापना केली जाते. पिंड तयार करून त्यांना पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर) आणि पाण्याने स्नान घातले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांसाठी तीन प्रकारचे पिंड (जव, तांदूळ आणि तीळ) तयार केले जातात. हे पिंड पितरांना अर्पण केले जातात. श्राद्ध विधी पूर्ण झाल्यावर ब्राह्मणांना भोजन दिले जाते आणि त्यांना दक्षिणा दिली जाते. संपूर्ण विधीमध्ये योग्य मंत्रांचे पठण केले जाते, ज्यामुळे पितरांना शांती मिळते. हे श्राद्ध आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आणि कुटुंबाला पितृदोषापासून मुक्त करण्यासाठी केले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitrudosh: तीन पिढ्यांमध्ये घरात अशी घटना घडल्यास त्रिपिंडी श्राद्ध करावं; अडचणींच्या मुळावर घाव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement