PitruDosh: महापाप केल्याप्रमाणेच आहेत या चुका! पितृदोष मागे लागण्याचं कारण; सगळ्या कुटुंबाला त्रास

Last Updated:

PitruDosh: पितृदोष टाळण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. गरजू ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. गरिबांना दान दिले जाते. पूर्वजांची अवकृपा आणि पितृदोष टाळण्यासाठी

News18
News18
मुंबई : पितृपक्षाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वजांची कृपा राहण्यासाठी पूर्ण 15 दिवस विधी करण्याची तरतूद पंचागात केली आहे. पितृदोष टाळण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. गरजू ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. गरिबांना दान दिले जाते. पूर्वजांची अवकृपा आणि पितृदोष टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या वर्षी पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत आहे. या काळात पूर्वजांचे विधी पूर्वक श्राद्ध-विधी-कर्म. घरात अशांतता, कलह, दारिद्र्य येते. विवाहयोग्य तरुण-तरुणी लग्न करत नाहीत, मुले होत नाहीत.
1. पूर्वजांचे अंतिम संस्कार योग्य प्रकारे न करणे: जर पूर्वजांचे अंतिम संस्कार योग्य रीतीने, विधीपूर्वक आणि शास्त्रानुसार केले नाहीत, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. त्यामुळे पितृदोष लागतो.
2. श्राद्ध कर्म आणि पिंडदान न करणे: पितरांना मोक्ष मिळावा यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणे आवश्यक असते. जर कोणी हे विधी केले नाहीत किंवा ते विसरले, तर पितृदोष लागण्याची शक्यता असते.
advertisement
3. पूर्वजांना दिलेले वचन पूर्ण न करणे: जर तुमच्या पूर्वजांना तुम्ही काही वचन दिले असेल आणि ते पूर्ण केले नसेल, तर यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होऊ शकतो.
4. वडीलधाऱ्यांचा अपमान करणे: घरात आपल्या वडीलधाऱ्यांचा, आई-वडिलांचा किंवा इतर ज्येष्ठांचा अनादर करणे किंवा त्यांना त्रास देणे हे देखील पितृदोष लागण्याचे एक कारण मानले जाते. 
advertisement
5. विवाहबाह्य संबंध: जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेवले असतील, तर त्यामुळे पूर्वजांचा अपमान होतो आणि यामुळे पितृदोष लागतो.
6. पितरांच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणे: पूर्वजांनी कमावलेल्या संपत्तीचा किंवा मालमत्तेचा दुरुपयोग करणे किंवा ती चुकीच्या कामांसाठी वापरणे यामुळे सुद्धा पितृदोष लागतो.
advertisement
7. वृक्ष तोडणे किंवा पर्यावरणाचा नाश करणे: काही धार्मिक ग्रंथांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने पिंपळ, वड किंवा इतर पवित्र मानलेल्या वृक्षांची अकारण तोडणी केली, तर यामुळेही पितृदोष निर्माण होऊ शकतो. 
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
PitruDosh: महापाप केल्याप्रमाणेच आहेत या चुका! पितृदोष मागे लागण्याचं कारण; सगळ्या कुटुंबाला त्रास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement