advertisement

Nagpur Crime : दारुचा ग्लास हातातून पडला अन् जीव गमावला, गुत्यावरील धक्कादायक घटना

Last Updated:

Nagpur Crime News : दारू पिण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाच्या हातून दारूचा ग्लास फुटल्याने संतप्त गुत्त्यावरील कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

News18
News18
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर: मागील काही काळापासून गुन्हेगारीच्या भयंकर घटना समोर येत आहेत. छोट्या कारणांनी, छोट्या वादांमुळे लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. अशीच एक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. खडगाव मार्गावरील सायरे देशी दारू गुत्त्यावर मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. दारू पिण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाच्या हातून दारूचा ग्लास फुटल्याने संतप्त गुत्त्यावरील कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव सूरज भलावी (वय 27) असून, तो नियमितपणे दारू गुत्त्यावर जात असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री तो सायरे देशी दारू गुत्त्यावर गेला होता. त्यावेळी दारूचा ग्लास त्याच्या हातून खाली पडून फुटला. या क्षुल्लक कारणावरून गुत्त्यावरील कामगारांनी सुरुवातीला सूरजला शिवीगाळ केली आणि नंतर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
advertisement
मारहाणीनंतर सूरजला गुत्त्याच्या बाहेर फेकून देण्यात आले. काही वेळाने ही माहिती त्याचा भाऊ सौरभ भलावी याला मिळाली. सौरभने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजला उपचारासाठी मेवो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सौरभ भलावी यांच्या तक्रारीवरून खडगाव पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur Crime : दारुचा ग्लास हातातून पडला अन् जीव गमावला, गुत्यावरील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement