Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल इतकी मोठी गोष्ट लपवली? प्रसिद्ध अभिनेत्रीचा देओल कुटुंबावर गंभीर आरोप, VIDEO

Last Updated:

Dharmendra Death: बॉलिवूडमधील सर्वांत वादग्रस्त अशी ओळख असलेल्या अभिनेत्रीने धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले आणि तातडीने त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल होते. अशातच त्यांना व्हेंटिलेटरवरही हलवण्यात आले असल्याच्या बातम्याही पसरल्या. यानंतर धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि उर्वरित उपचार त्यांच्या घरीच करण्यात येत होते. अखेर २४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक अफवा सुरू झाल्या. अनेकांनी धर्मेंद्र यांच्यावर इतक्या घाईघाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र, आता 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतने देओल कुटुंबावर थेट गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.

देशाच्या हिरोचे अंतिम दर्शन नाही?

राखी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत, धर्मेंद्र यांना राजकीय सन्मानाने निरोप न दिल्याबद्दल आणि चाहत्यांना त्यांच्या अंतिम दर्शनापासून वंचित ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. राखी म्हणाली, "धर्मेंद्र हे फक्त देओल कुटुंबाचे नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे हीरो होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. ते तुमचे वडील होते, आम्ही त्याचा आदर करतो. पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी आमचे हीरो होते. श्रीदेवी किंवा राजेश खन्ना यांना ज्या प्रकारे राजकीय सन्मानाने निरोप देण्यात आला, तसा सन्मान धर्मेंद्र यांना का मिळाला नाही? त्यांच्या आठवणीत एक फूलही का अर्पण केले गेले नाही?"
advertisement
देशभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांना शेवटचे पाहायचे होते, पण तसे का केले गेले नाही, असा सवाल यावेळी राखीने उपस्थित केला.
advertisement

राखीच्या स्वप्नात आले होते धरमजी!

इतकेच नाही, तर राखी सावंतने धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वेळेबद्दलही धक्कादायक दावा केला आहे. राखीने गंभीर आरोप केला की, "मला अनेक लोकांनी सांगितले, तसेच रुग्णालयातील डॉक्टरांनीही सांगितले की, त्यांचा मृत्यू दोन दिवस आधीच झाला होता." यासोबतच तिने अत्यंत नाट्यमय दावा करत सांगितले, "मला स्वप्नात स्वतः धरमजी आले होते!" चाहत्यांना अंतिम भेटीची संधी न मिळाल्याचे दुःख तिला वाटते, असेही ती म्हणाली.
advertisement

निधनामुळे वाढदिवसाचे सेलिब्रेशन रद्द

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखी सावंतला तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनही रद्द करावे लागले. राखी सावंतचा वाढदिवस २५ नोव्हेंबर रोजी असतो. "माझ्या वाढदिवसाची पार्टीची पूर्ण तयारी झाली होती, पण त्यांच्या निधनाची बातमी कळताच आम्ही ती तात्काळ रद्द केली," असे तिने सांगितले.
राखी सावंत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा तिने धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावर थेट भाष्य करून एक नवा वाद निर्माण केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल इतकी मोठी गोष्ट लपवली? प्रसिद्ध अभिनेत्रीचा देओल कुटुंबावर गंभीर आरोप, VIDEO
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement