IND VS PAK: अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'काय खेळलास अभिषेक बच्चन...'

Last Updated:

IND VS PAK: भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप चॅम्पियन आपल्या नावावर केला. त्यामुळे सध्या देशभरात या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे.

अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं
अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं
मुंबई : भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप चॅम्पियन आपल्या नावावर केला. त्यामुळे सध्या देशभरात या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. मैदानावर खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून ट्रॉफी जिंकली आणि सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी आनंद साजरा केला. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो अमिताभ बच्चन यांचा एक खास पोस्ट.
टूर्नामेंटदरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर एका चर्चेत होता. तो पाकिस्तानच्या प्लॅनिंगबद्दल बोलत होता आणि अभिषेक शर्माचे नाव घ्यायचे असताना चुकून त्याने "अभिषेक बच्चन" असं म्हटलं. त्याच वेळी ही चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. सोशल मीडियावर याची जोरदार खिल्ली उडाली.
advertisement
भारताने अंतिम सामन्यात पाच विकेट्सनी पाकिस्तानला हरवले. त्यानंतर बिग बींनी X (ट्विटर) वर एक भन्नाट पोस्ट टाकली. त्यांनी लिहिलं, "तू जिंकलास!! छान खेळलास 'अभिषेक बच्चन'... तिथे जीभ अडखळली झाली, आणि इथे बॅटिंग, बॉलिग, फिल्डिंग न करता शत्रूला अडखळवलं ते बोलती बंद! जय हिंद! जय भारत! जय माँ दुर्गा."
advertisement
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी थेट शोएब अख्तरचा उल्लेख केला नसला तरी संदेश सगळ्यांना समजला. चाहत्यांनी लगेचच "ही खरी जखमेवर मीठ चोळणारी स्टाईल आहे" असं म्हणत बिग बींच्या विनोदाची वाहवा केली. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
IND VS PAK: अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'काय खेळलास अभिषेक बच्चन...'
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement