"माझं दुसरं लग्न..." घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचं 'ते' ट्विट व्हायरल, म्हणाला, "मी घटस्फोट घेतोय..."

Last Updated:

ऐश्वर्या राय बच्चनने काल तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. मात्र अभिषेक बच्चनसह बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तिला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या अफवा खऱ्या असल्याची खात्री पटत आहे.

ऐश्वर्या राय बच्चनने काल तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. मात्र अभिषेक बच्चनसह बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तिला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या अफवा खऱ्या असल्याची खात्री पटत आहे.
ऐश्वर्या राय बच्चनने काल तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. मात्र अभिषेक बच्चनसह बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तिला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या अफवा खऱ्या असल्याची खात्री पटत आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 17 वर्षे उलटली आहेत, परंतु त्यांच्यातील मतभेदांच्या अफवा वेळोवेळी येत आहेत. अनंत अंबानींच्या लग्नात अभिषेकशिवाय पोहोचलेली ऐश्वर्या राय आणि अभिषेकची 'घटस्फोट पोस्ट' लाइक करणे, या गोष्टी त्याच्या घटस्फोटांच्या अफवांवर विश्वास ठेवण्याला कारणीभूत ठरत होते. अभिषेकच्या निम्रत कौरसोबतच्या अफेअरच्या अफवांनी तर त्यात आणखीनच भर पडली. दरम्यान, अभिषेक बच्चनचे एक वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहेत, परंतु त्यांचे चाहते अजूनही त्यांना बॉलिवूडचे पॉवर कपल मानतात. अमिताभ बच्चनच्या वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनची अनुपस्थिती असो किंवा अभिषेक बच्चन आणि निम्रत कौरच्या अफेअरच्या अफवा असो, त्यांच्या नात्याबद्दल चुकीचे अंदाज बांधले जात असून बरेच जण असे म्हणत आहेत की हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. दरम्यान, अभिषेक बच्चनचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, यामध्ये त्याने पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.
advertisement
2014 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अभिषेक बच्चनने मौन पाळण्याऐवजी त्याचा ठाम नकार दिला होता आणि चाहत्यांनाही खोट्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे सांगितले होते. अभिषेकने X वर लिहिले होते की, 'मी घटस्फोट घेतोय हे मलाही खरं वाटतंय. मला हे कळवल्याबद्दल धन्यवाद! माझं दुसरं लग्न केव्हा होईल तेही सांगाल का?'
advertisement
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात फक्त जवळच्या मित्रांनीच हजेरी लावली होती
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न एप्रिल 2007 मध्ये बच्चन कुटुंबाच्या मुंबईत झाले होते. त्यांचा विवाह सोहळा भव्य होता, परंतु यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे - आराध्याचे स्वागत केले.
advertisement
बच्चन कुटुंबीयांनी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विशेषत: ऐश्वर्या राय बच्चनने राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाला तिच्या सासरच्यांशिवाय तिच्या मुलीसोबत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्यापासून या अफवांना उधाण आले. ऐश्वर्या राय बच्चनने काल तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. मात्र अभिषेक बच्चनसह बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तिला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या अफवा खऱ्या असल्याची खात्री पटत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"माझं दुसरं लग्न..." घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचं 'ते' ट्विट व्हायरल, म्हणाला, "मी घटस्फोट घेतोय..."
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement