Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुस्साट; 'या' दिवशी होणार प्रवास सुरु

Last Updated:

Mumbai-Ahmedabad Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच धावण्यास तयार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की प्रकल्पाच्या अंतिम तपासण्या आणि सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ट्रेन सुरू होईल.

News18
News18
मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत अखेर मोठी माहिती समोर आलेली आहे. भारतातील पहिला हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्प कधी सुरू होईल याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सुरत येथील बुलेट ट्रेन स्टेशनला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आणि या संदर्भात महत्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत ते बिलीमोरा या दरम्यानचा 50 किलोमीटरचा पहिला भाग 2027 पर्यंत सुरू होईल. यानंतर 2028 पर्यंत ठाणे ते अहमदाबाद विभाग कार्यान्वित होईल आणि अखेरीस 2029 पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे मार्ग पूर्णपणे चालू होईल.
किती तासांचा वेळ वाचणार?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग चालू झाल्यावर प्रवाशांना या दोन प्रमुख शहरांमधील अंतर फक्त दोन तास आणि सात मिनिटांत पार करता येईल, जे प्रवासाचा वेळ खूपच कमी करेल. तसेच त्यांनी हे देखील नमूद केले की, मुख्य मार्गावर गाड्यांची वेग क्षमता 320 किलोमीटर प्रतितास असून रिंग रोड मार्गावर 80 किलोमीटर प्रतितास गाड्या धावतील. गाड्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम हालचालीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान गाड्यांच्या कंपनांना शोषून घेण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांपासून ते स्लीपर कंपोझिट मटेरियल आणि रोलर बेअरिंगपर्यंत विस्तारित आहे.
advertisement
सुरत स्थानकाचे बांधकाम पूर्णपणे सुरू असून येथे फिनिशिंग आणि युटिलिटी कामे सुरु आहेत. या प्रकल्पात पहिला टर्नआउट बसवण्यात आला आहे. जेथे ट्रॅक जोडला किंवा वेगळा केला जातो. या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रोलर बेअरिंग प्रणाली विशेष स्लीपर आणि इतर आधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, जे उच्च गतीवर सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतील. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकल्पाच्या रचना आणि ट्रॅकवरील यंत्रणा सुरक्षिततेसाठी अत्यंत काटेकोरपणे विकसित केल्या आहेत, जेणेकरून 320 किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावत असताना कोणतीही समस्या येऊ नये.
advertisement
या शहरातील प्रवाशांना होणार मोठा फायदा
या प्रकल्पामुळे मुंबई-ठाणे, ठाणे-सुरत, आणि सुरत-अहमदाबाद या मार्गांवरील प्रवाशांचा वेळ वाचेल आणि व्यापार, उद्योग, पर्यटन यांनाही मोठा फायदा होईल. तसेच, बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आणि सांगितले की, संपूर्ण मार्गातील सर्व स्टेशन आणि ट्रॅक पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या प्रकल्पामुळे देशात हाय-स्पीड रेल्वेचा नवीन अध्याय सुरू होणार आहे.
advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प केवळ प्रवासाच्या वेळेतच बदल घडवणार नाही, तर भारतीय रेल्वेच्या इतिहासातही हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. 2029 पर्यंत संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची संधी मिळेल. या प्रकल्पामुळे देशात हाय-स्पीड रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे आणि भविष्यात भारताच्या रेल्वे नेटवर्कला जागतिक दर्जा मिळण्यास मदत होईल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुस्साट; 'या' दिवशी होणार प्रवास सुरु
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement