Tiranga Yatra : भाजपची ठिकठिकाणी तिरंगा यात्रा, बच्चू कडूंचा स्फोटक आरोप, ही यात्रा म्हणजे...

Last Updated:

Bachchu Kadu On Tiranga Yatra : भाजपची ही तिरंगा यात्रा ही राजकीय असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपच्या या तिरंगा यात्रेवर टीका केली आहे.

News18
News18
नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रा सुरू करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेत भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक केले जात असून पाकिस्तानला धडा शिकल्याबद्दल केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले जात आहे. भाजपची ही तिरंगा यात्रा ही राजकीय असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपच्या या तिरंगा यात्रेवर टीका केली आहे. अपयश झाकण्यासाठीच आता ‘तिरंगा यात्रा’ काढून भावनिक वातावरण तयार केले जात असल्याची टीका माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली.
वर्धा येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत धडा शिकविल्याचा कांगावा सरकार करत आहे. पण पाकव्याप्त भाग पुन्हा न घेता कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारला जे अपयश आलंय हे लपविण्यासाठी आता सरकारनं तिरंगा यात्रा सुरू केली आहे, अशी टिका माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली.
advertisement
बच्चू कडू यांनी म्हटले की, पहलगाममध्ये सुरक्षा यंत्रणेत त्रुटी होती. सरकारनेदेखील ही बाब मान्य केली आहे. पहलगाममध्ये त्या ठिकाणी किमान सुरक्षा व्यवस्था असती तरी लोकांचे प्राण वाचले असते. या त्रुटीमुळेच 28 जणांचा मृत्यू झाला. पहलगाममधील हे अपयश लपवण्यासाठी भाजपची तिरंगा यात्रा सुरू असल्याची टीका कडू यांनी केली.
भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढली जात आहे. या तिरंगा यात्रेत अनेक मंत्री, आमदार, नेते सहभागी होत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसनेदेखील जय हिंद यात्रेची घोषणा केली आहे. भाजपकडून सैन्यांच्या शौर्याचे राजकारण सुरू असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tiranga Yatra : भाजपची ठिकठिकाणी तिरंगा यात्रा, बच्चू कडूंचा स्फोटक आरोप, ही यात्रा म्हणजे...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement