Supriya Sule : 'कंत्राटी'वरून राजकारणाला 'भरती', 'त्या नेत्यांचा राजीनामा घ्या', सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी
- Published by:Shreyas
Last Updated:
कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय, कारण महाविकासआघाडी सरकारचे पाप आपल्या माथी नको, असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जीआर रद्द केला, यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
मुंबई, 21 ऑक्टोबर : कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय, कारण महाविकासआघाडी सरकारचे पाप आपल्या माथी नको, असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जीआर रद्द केला, त्यावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगलंय. आजचं भाजपचं आंदोलन म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाँटे, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे, तर आम्ही काढलेला जीआर दीड वर्षे का बदलला नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी केलाय. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. कंत्राटी कामगारांचे षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झालं, पण विरोधकांनी आम्हाला बदनाम केलं, म्हणून आम्ही माफी मागो आंदोलन केलंय, असं फडणवीस म्हणाले आहेत.
कंत्राटी भरती महाविकासआघाडीचं पाप असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात महाविकासआघाडी माफी मांगो आंदोलन केलं. ठाणे, पुणे, कोल्हापूरसह भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीच्या जीआरवर ज्या नेत्यांनी सही केली आहे, ते नेते आज सत्तेत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे, तसंच आमच्या दबावामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
advertisement
'राज्यात आंदोलनं चालली आहेत, या आंदोलनांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हिंसा होईल की काय, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्येही वाद दिसतोय, त्यामुळे गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
'जीआरच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कोण कोण होतं? एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे सगळे त्या कॅबिनेटला हजर होते, त्यामुळे माझी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना विनंती आहे की ज्यांच्या सह्या आहेत त्यांचे राजीनामे घ्या,' अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 21, 2023 5:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule : 'कंत्राटी'वरून राजकारणाला 'भरती', 'त्या नेत्यांचा राजीनामा घ्या', सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी










