सांगलीचं प्रशासन नंबर वन! सात-बाराच्या त्रासातून सुटका होणार, शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा दोन्ही वाचणार

Last Updated:

Sangali News : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या...

Sangali News
Sangali News
Sangali News : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या सात-बारा उताऱ्यावरील नोंदी आणि फेरफार प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूपच वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे, जे काम पूर्ण होण्यासाठी पूर्वी सहा महिने लागत होते, ते आता अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे फेरफार नोंदीच्या कामात सांगली जिल्ह्याने संपूर्ण राज्यात आघाडी घेतली आहे.
वेळेत झालेली अविश्वसनीय बचत
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महसूल विभागाने ही किमया साधली आहे. आकडेवारी पाहिल्यास हा बदल किती मोठा आहे, हे लक्षात येते...
  • वारसा हक्काच्या नोंदी : पूर्वी या कामासाठी सरासरी 191 दिवस लागत होते, आता हेच काम फक्त 88 दिवसांत पूर्ण होत आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांच्या वेळेची तब्बल 103 दिवसांची बचत होत आहे.
  • खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी : जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर होणाऱ्या फेरफार नोंदीसाठी पूर्वी 164 दिवस लागायचे, आता तो कालावधी 92 दिवसांवर आला आहे.
  • अनोंदणीकृत फेरफार निकाली काढण्यासाठी 25 ऐवजी 22 दिवस, तर नोंदणीकृत दस्तांवरील फेरफार 34 ऐवजी 28 पूर्ण होत आहे.
advertisement
ही वेगवान कार्यप्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा एक भाग आहे. यामुळे शेतकऱ्यांचा केवळ वेळच नाही, तर पैसा आणि मानसिक त्रासही वाचत आहे.
प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक
या यशस्वी मोहिमेमुळे महसूल विभागाची प्रतिमा उंचावली असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, "अपर मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे यश मिळवले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रभावी उपाययोजना भविष्यातही सुरूच राहतील." या मोहिमेच्या यशामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीचं प्रशासन नंबर वन! सात-बाराच्या त्रासातून सुटका होणार, शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा दोन्ही वाचणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement