Parabhani Violence : ''मुद्दाम हिंसाचार पेटवला का?'' विधानसभेत विरोधक आक्रमक, काँग्रेसचा गंभीर आरोप...

Last Updated:

Parabhani Violence : परभणी आणि बीडमधील प्रकरणाचा मुद्यावर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.

''मुद्दाम हिंसाचार पेटवला का?'' विधानसभेत विरोधक आक्रमक, काँग्रेसचा गंभीर आरोप...
''मुद्दाम हिंसाचार पेटवला का?'' विधानसभेत विरोधक आक्रमक, काँग्रेसचा गंभीर आरोप...
नागपूर :  परभणीमध्ये बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार आणि त्यानंतर आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी परभणीच्या मुद्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्षांनी या मुद्यावर बुधवारी चर्चा ठेवली असल्याचे सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या या प्रस्तावावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. परभणी सारख्या महत्त्वाच्या मुद्यावर लागलीच चर्चा का नाही, असा सवाल विरोधकांनी केला.
परभणी शहरात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर परभणी बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त होत आहे. परभणी आणि बीड घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन केले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला.
advertisement

विरोधकांचा गंभीर आरोप...

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. परभणी बाबत चर्चा आजच घेण्याची मागणी पटोले यांनी केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. परभणीत हिंसाचार सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. हिंसाचाराच्या चार तासानंतर पोलिसांनी कारवाई केली. हिंसाचार भडकण्याची पोलीस वाट पाहत होते का, असा सवाल त्यांनी केला. परभणी, बीडच्या मुद्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
advertisement

विधानसभा अध्यक्षांचे निर्देश...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजच्या ऐवजी उद्या सभागृहात चर्चा होईल असे सांगितले. या विषयावर विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्य या प्रकरणावर बोलतील. सरकारने या मुद्यांवर निवेदन सादर करावे असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.\
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parabhani Violence : ''मुद्दाम हिंसाचार पेटवला का?'' विधानसभेत विरोधक आक्रमक, काँग्रेसचा गंभीर आरोप...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement