Maharashtra Budget 2025: समृद्धी महामार्ग ठरणार गेम चेंजर, महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी महामार्ग अंतिम टप्प्यात!

Last Updated:

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली असून 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 64 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.

News18
News18
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाचे 99% काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामांना वेग मिळाला असून, 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 64 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महामार्गाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी विविध योजनांद्वारे निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आशियाई विकास बँक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण
समृद्धी महामार्गासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या अंतर्गत महामार्गाच्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे.
टप्पा-2 आणि टप्पा-3 च्या कामांना वेग
> टप्पा-2 अंतर्गत 3,939 कोटी रुपये किंमतीच्या 468 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यापैकी 350 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
advertisement
> टप्पा-3 मध्ये 6,589 कोटी रुपये खर्चून 755 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे 23 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
सिमेंट काँक्रीटीकरण आणि महामार्ग विकासाला गती
सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. या कामांसाठी 36,964 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यातून रस्त्यांची टिकाऊपणा वाढवण्यावर भर दिला जात आहे.
advertisement
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागांचा विकास
ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 3,785 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून, उर्वरित कामे जलदगतीने सुरू आहेत. येत्या 2025-26 या वर्षासाठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
advertisement
समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राला मिळणारे फायदे
-वेगवान दळणवळणामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल.
-शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीच्या सुविधा अधिक सुटसुटीत होतील.
-राज्यातील पर्यटन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होईल.
-महाराष्ट्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी समृद्धी महामार्गाच्या कामांना वेग देत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget 2025: समृद्धी महामार्ग ठरणार गेम चेंजर, महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी महामार्ग अंतिम टप्प्यात!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement