आचारसंहितेच्या काही तास आधी GR, महाराष्ट्रातल्या शहराचं नाव बदललं, बाळासाहेबांची 40 वर्षांपूर्वीची मागणी मान्य!

Last Updated:

महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, त्याआधी महाराष्ट्रातील प्रमुख शहराच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झालं आहे.

आचारसंहितेच्या काही तास आधी GR, महाराष्ट्रातल्या शहराचं नाव बदललं, बाळासाहेबांची 40 वर्षांपूर्वीची मागणी मान्य!
आचारसंहितेच्या काही तास आधी GR, महाराष्ट्रातल्या शहराचं नाव बदललं, बाळासाहेबांची 40 वर्षांपूर्वीची मागणी मान्य!
मुंबई : महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 2 डिसेंबरला महाराष्ट्रामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे, तर या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, पण आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहराचं नाव बदलण्याच्या मागणीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
महाराष्ट्र सरकारने शहराचं नामांतर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यता दिली, त्यानंतर शहराच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झालं. सांगलीमधल्या इस्लामपूर शहराचं नामांतर इश्वरपूर करण्याची राज्य शासनाची मागणी मान्य झाली आहे. त्यानंतर आता इस्लामपूर नगरपरिषदेचं नाव बदलून उरूण इश्वरपूर करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र शासनाने जीआर काढून दिला आहे.
advertisement

बाळासाहेबांची मागणी पूर्ण

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव इश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं सांगितलं होतं. केंद्र सरकारच्या गृह विभागाने हा प्रस्ताव सर्व्हे ऑफ इंडिया विभागाकडे पाठवला, त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर गृहमंत्रालयाने नामांतरावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं.
advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंत सबनीस यांनी 1970 साली सगळ्यात आधी नामांतराची मागणी केली होती. तर 1986 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या यल्लमा चौकातल्या जाहीर सभेत हे इस्लामपूर नाही इश्वरपूर आहे, अशी जाहीर घोषणा दिली होती.

महाराष्ट्रात शहरांची नामांतरं

याआधी महाराष्ट्रमध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव तर अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या रेल्वे स्टेशनचं नावही बदलून अहिल्यानगर करण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आचारसंहितेच्या काही तास आधी GR, महाराष्ट्रातल्या शहराचं नाव बदललं, बाळासाहेबांची 40 वर्षांपूर्वीची मागणी मान्य!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement