Narendra Modi : 'छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने...', महायुतीच्या विजयावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विजय जल्लोषाच्या सभेतून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. आणि महाराष्ट्रातील मतदार तरूणाचं, शेतकऱ्यांच आणि जनतेचे आभार मानले आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने भाजपचा सुपडासाफ करत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपकडून आता विजय जल्लोष सूरू झाला आहे. या विजय जल्लोषाच्या सभेतून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. आणि महाराष्ट्रातील मतदार तरूणाचं, शेतकऱ्यांच आणि जनतेचे आभार मानले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी महाराष्ट्रातील विजयावर मराठीतून देखील प्रतिक्रियी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिलं तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा. छत्रपती शिवाजी महाराज,शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वाच्या धरतीने हे सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत,असे देखील मोदींनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 23, 2024 8:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Narendra Modi : 'छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने...', महायुतीच्या विजयावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?










