फडणवीस म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे'चा फायदा झाला, त्यावर शरद पवार म्हणाले, त्यासाठीच...

Last Updated:

शरद पवार रविवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेने दिलेला कौल स्वीकारला असून पुन्हा महाराष्ट्रात जाऊन कर्तृत्ववान तरुणांची पिढी उभा करेन, असा मनोदय बोलून दाखवला.

शरद पवार सातारा पत्रकार परिषद
शरद पवार सातारा पत्रकार परिषद
सातारा : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीच्या जोरावर आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आम्हाला बहुमत मिळाले. परंतु बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हा मेसेज देखील जनतेत गेला, त्याचाही आम्हाला फायदा झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २४ तास उलटले तरी शरद पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नव्हते. त्यामुळे शरद पवार हे निवडणूक पराभवाचे विश्लेषण काय करतात, याकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. पवार रविवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेने दिलेला कौल स्वीकारला असून पुन्हा महाराष्ट्रात जाऊन कर्तृत्ववान तरुणांची पिढी उभा करेन, असा मनोदय बोलून दाखवला.
advertisement
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याने ध्रुवीकरण झाले का?
मनोज जरांगे यांच्या भूमिकांनी ओबीसी एकवटले आणि ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला झाला, याबद्दल विचारले असता, यासंबंधीची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. पण असे लोक बोलले आहेत, असे पवार म्हणाले. तसेच बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याने ध्रुवीकरण झाले का असे विचारले असता निश्चित ध्रुवीकरण झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तेच करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते.
advertisement
समाजाच्या काही घटकांनी मतादानामध्ये वेगळा दृष्टीकोन घ्यावा असे प्रयत्न झाले
इंडिया आघाडी सामूहिक निवडणूक लढविताना कमी पडली का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, आमच्या सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कष्ट खूप घेतले. नेत्यांनी पण कष्ट घेतले. पण तरीही निकाल हवा तसा लागला नाही. लाडकी बहीण योजना आणि काही लोकांनी धार्मिक अँगल देण्याचा प्रयत्न केला, त्याचा निकालावर परिणाम झाला. समाजाच्या काही घटकांनी मतादानामध्ये वेगळा दृष्टीकोन घ्यावा, यासाठी काहींनी प्रयत्न केल्याचे काही लोक सांगतात, आम्ही हे तपासून पाहू, असे शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीस म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे'चा फायदा झाला, त्यावर शरद पवार म्हणाले, त्यासाठीच...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement