Video: गांधी टोपी घातलेल्या शेतकऱ्याने इंग्रजीतून सरकारला खडसावले, शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध

Last Updated:

ShaktiPeeth Mahamarg Project: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेस मागील अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरू आहे.

शेतकऱ्यांचा 'शक्तिपीठ'ला विरोध
शेतकऱ्यांचा 'शक्तिपीठ'ला विरोध
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाला बाधित जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमिनीचे अधिग्रहण करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. तसेच कुणाचाही मागणी नसताना राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा घाट का घातला आहेय़ असा कळीचा प्रश्नही शेतकरी विचारीत आहेत.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेस मागील अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरू आहे. नागपूर ते रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी अनेक चांगले रस्ते आहेत. मग शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी इंग्रजी भाषेतून सरकारला फटकारले.
बार्शी तालुक्यातील शेलगाव आर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत शक्तिपीठाला तीव्र विरोध दर्शवला. शेतकरी भास्कर एकनाथ पाटील यांची तीन एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात भूसंपादन होणार असल्यामुळे त्यांनी महामार्गाला विरोध करीत आपल्या व्यथा मांडल्या. तसेच शक्तिपीठ मार्गाच्या इंग्रजी शासन अध्यादेशाला शेतकऱ्यांनी इंग्रजीमधूनच उत्तर दिले आहे.
advertisement

गांधी टोपी घातलेल्या शेतकऱ्याने इंग्रजीतून सरकारला खडसावले

Quotation are not invited, road should be cancel असे म्हणत भास्कर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन इंग्रजी भाषेतून सरकारला खडसावले. भास्कर पाटील यांनी शेतीचं महत्व पटवून देताना अंतःकरणापासून सात पिढ्यापासून कसलेली जमीन शासन आपल्याकडून हिसकावून घेत असल्याचे म्हणाले.
advertisement

आमच्या सात पिढ्यांनी काळ्या आईची सेवा केली, जमीन गेली तर आम्ही जगायचे कसं?

मागणीशिवाय पुरवठा करता येत नाही. मग कुणाचीही मागणी नसताना शासनाने शक्तिपीठ रस्त्याचा घाट का घातला आहे. कंत्राटदारांसाठी हा महामार्ग होतोय का? असा सगळ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. अनावश्यक महामार्ग करू नका. काळी आई आमची माता आहे. आमच्या कित्येक पिढ्यांनी काळ्या आईची सेवा केलीये. आम्हाला आमची आई प्रिय आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी ही शेती ठेवली, तीच गेली तर आम्ही जगायचे कसे? अशा प्रश्नांच्या फैरी बाधित शेतकरी भास्कर पाटील यांनी सरकारवर झाडल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: गांधी टोपी घातलेल्या शेतकऱ्याने इंग्रजीतून सरकारला खडसावले, शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement