विकसित भारतात प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न किती असेल? आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

Last Updated:

Per Capita Income: भारताने 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीची आवश्यकता आहे. आर्थिक सुधारणा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या मदतीने भारत जलद प्रगती करू शकतो.

News18
News18
नवी दिल्ली: भारताने 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे. पनगडिया यांच्या मतानुसार हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रति व्यक्ति उत्पन्नात दरवर्षी 7.3% वाढ आवश्यक आहे. सध्या भारताचे प्रति व्यक्ति उत्पन्न सुमारे 2,570 डॉलर आहे. जे दक्षिण कोरिया, तैवान, चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, जर भारताने योग्य धोरणे राबवली, तर 2047 पर्यंत हे उत्पन्न 14,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
शनिवारी 49व्या सिव्हिल अकाउंट्स डे निमित्त पनगडिया म्हणाले की, पंतप्रधानांचा विकसित भारताचा स्वप्नसाकार करणे शक्य आहे. तंत्रज्ञान, भांडवली गुंतवणूक आणि कौशल्य विकासाच्या मदतीने देश वेगाने प्रगती करू शकतो. कमी उत्पन्नामुळे भारताकडे प्रगतीसाठी मोठी संधी आहे.
Cheapest Gold: या पाच ठिकाणाहून सोने खरेदी करा, थेट ८ ते १५ हजार रुपये वाचतील
पनगडिया हे कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. भारतात अनेक आर्थिक सुधारणा केल्या गेल्या असून भविष्यातही सुधारणा सुरू राहतील. जागतिक बँकेच्या निकषानुसार विकसित देशांसाठी 14,000 डॉलर प्रति व्यक्ति उत्पन्नाची मर्यादा निश्चित केली आहे.
advertisement
अत्यंत दुर्मीळ Stock, गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले, 1 लाखाचे झाले 7.87 कोटी
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या दरवर्षी 0.6% दराने वाढेल. त्यामुळे, विकसित देशांच्या श्रेणीत पोहोचण्यासाठी भारताच्या GDP मध्ये दरवर्षी 7.9% वाढ आवश्यक आहे. गेल्या 21 वर्षांत भारताची सरासरी विकासदर 7.8% राहिली आहे, त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
विकसित भारतात प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न किती असेल? आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement