advertisement

Mumbai Water: मुंबईकर पाण्याचं टेन्शन सोडा, ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, कामाला गती!

Last Updated:

Mumbai Water Supply: पाणीगळती, जलवाहिन्या फुटणे तसेच चोरीसारख्या घटनांमुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. आता या अडचणींतून कायमची सुटका होणार आहे.

मुंबईकर पाण्याचं टेन्शन सोडा, ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, कामाला गती!
मुंबईकर पाण्याचं टेन्शन सोडा, ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, कामाला गती!
मुंबई: महानगरी मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या सुरक्षेसमोरील मोठा अडथळा अखेर दूर झाला असून शहराला भविष्यात अधिक सुरळीत आणि सुरक्षित पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. भिवंडीतील येवई जलाशय ते मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या 21 किमी लांबीच्या जलबोगदा प्रकल्पातील कशेळी ते मुलुंड या 7 किमी टप्प्यासाठी आवश्यक असलेली CRZ (Coastal Regulation Zone) परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रखडलेले काम आता वेगाने पुढे जाणार आहे.
सध्या मुंबईला भातसा खोऱ्यातून प्रतिदिन सुमारे 200 कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी 140 कोटी लिटर पाण्यावर पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते मुंबई 2 आणि मुंबई 3 या मुख्य जलवाहिन्यांद्वारे शहरात आणले जाते. उर्वरित 60 कोटी लिटर पाणी वैतरणा व अप्पर वैतरणा जलवाहिन्यांमार्फत भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते.
advertisement
मुंबई–नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासह विविध विकासकामांमुळे जमिनीवरील मुख्य जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. पाणीगळती, जलवाहिन्या फुटणे तसेच चोरीसारख्या घटनांमुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. या पार्श्वभूमीवर, सुरक्षित आणि पर्यायी व्यवस्था म्हणून भूमिगत जलबोगदे उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
advertisement
या प्रकल्पांतर्गत येवई जलाशय ते कशेळी असा 14 किमी आणि कशेळी ते मुलुंड असा 7 किमी जलबोगदा उभारण्यात येणार असून एकूण लांबी 21 किमी आहे. 14 किमी बोगद्याचे काम सध्या सुरू असून कशेळी परिसरातील खारफुटीमुळे 7 किमी बोगद्याचे काम रखडले होते. मात्र आता CRZ परवानगी मिळाल्याने हा अडथळा दूर झाला आहे.
advertisement
जलबोगदे पूर्ण झाल्यानंतर जलाशय आणि पांजरापूर केंद्रातून येणारे पाणी मुख्यत्वे या बोगद्यांतून वाहून नेले जाईल. विद्यमान रस्त्यांवरील जलवाहिन्या आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याला अधिक सुरक्षितता आणि स्थैर्य मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईकर पाण्याचं टेन्शन सोडा, ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, कामाला गती!
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement