advertisement

Accident News : भरधाव वेगात कार धडकली विजेच्या खांबाला, 4 तरुणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

भीषण अपघात डुमरदगाला जाणाऱ्या मार्गावर झाला. अपघातग्रस्त कारचा वेग जास्त होता अशी स्थानिकांनी माहिती दिली.

News18
News18
रांची, 28 डिसेंबर : झारखंडची राजधानी रांचीमध्ये वेगवान कारचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. चालक कार भरधाव वेगाने चालवत होता आणि कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजते. भरधाव कार खांबाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कार पलटली. यात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भीषण अपघात डुमरदगाला जाणाऱ्या मार्गावर झाला. अपघातग्रस्त कारचा वेग जास्त होता अशी स्थानिकांनी माहिती दिली. कार अनियंत्रित झाल्यानंतर खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. यात चारही तरुणांचा मृत्यू झाला.
advertisement
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद पोलीसात करण्यात आली असून चौकशी केली जात आहे. अपघात होऊ नयेत यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून जागरुकता मोहिम राबवण्यात येते. मात्र तरीही भरधाव वेग आणि नियम न पाळल्याने अपघात होत आहेत.
याआधी रांचीतील ओरमांझी इथं उकरीदजवळ अपघात झाला होता. जमशेदपूरहून आराला जाणाऱ्या बसने मागून धडक दिली होती. यात बसचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात रांचीतच दोन वाहनांच्या भीषण धडकेत दोन तरुण ठार झाले होते.
view comments
मराठी बातम्या/देश/
Accident News : भरधाव वेगात कार धडकली विजेच्या खांबाला, 4 तरुणांचा जागीच मृत्यू
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement