जमिनी वाचणार! वांग-मराठवाडी धरणप्रकल्पातून 4 गावे वगळणार, शंभूराज देसाईंचा शेतकऱ्यांना दिलासा

Last Updated:

पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरण लाभक्षेत्राबाहेरील चार गावे वगळण्याचा निर्णय पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत घेतला आहे. या गावांमध्ये...

Patan News
Patan News
पाटण (सातारा) : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरण लाभक्षेत्राबाहेरील चार गावे वगळण्याचा निर्णय पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत घेतला आहे. या गावांमध्ये मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी आणि शिपतवाडी यांचा समावेश आहे. या संदर्भात, धरणग्रस्तांना वाटप करण्यासाठी संपादित केलेल्या ९.५५ हेक्टर जमिनीऐवजी रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही बैठक अपर जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
उमरकांचन येथील निनाईनगरवर गावठाणमध्ये भूखंड कमी असल्यामुळे घारेवाडी (ता. कराड) येथील शिल्लक भूखंडांची मागणी करण्यात आली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देऊन निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच, उमरकांचन येथील तीन प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई शासनाकडे जमा आहे. त्यांना ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन वाटप करण्यासाठी खास शासन निर्णय घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. संकलन रजिस्टरमधील त्रुटी असलेल्या सर्व प्रकरणे निकालात काढण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
advertisement
या बैठकीत, बुडीत क्षेत्रातील विद्युतपुरवठा तातडीने बुडीत क्षेत्राबाहेरून सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कार्यकारी अभियंता वरुण मोटे, तहसीलदार अनंत गुरव, पुनर्वसन तहसीलदार संदे, मनोज मोहिते, जगन्नाथ विभुते, सुनील पवार, विवेक पाटील, गणपत मोहिते आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
advertisement
पुनर्वसन प्राधिकरण समिती, पुणे विभागाचे अशासकीय सदस्य जगन्नाथ विभूते म्हणाले की, गेल्या तीस वर्षांपासून शासनाने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून लाभक्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादित केल्या होत्या. शासनाने याकडे दुर्लक्ष केले; पण पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ही मागणी मान्य झाली आहे, त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचणार आहेत. मात्र, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आणि धरणग्रस्तांच्या जमिनींना प्रत्यक्ष पाणी मिळेल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
जमिनी वाचणार! वांग-मराठवाडी धरणप्रकल्पातून 4 गावे वगळणार, शंभूराज देसाईंचा शेतकऱ्यांना दिलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement