Godavari River Flood: आभाळ फाटलं, गोदामाईचं पहिल्यांदाच रौद्ररूप; बीडमधील काळीज धस करणारे 7 PHOTOS
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः दमदार हजेरी लावली. सलग काही तासांच्या पावसामुळे गावोगाव पाणी साचले असून, शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्र तुडुंब भरल्याने पाणी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घुसले. शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. गावोगावी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मोगरा या गावचे शेतकरी तुकाराम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील पिके ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत.
advertisement
बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर दिसून येते. गेवराई, माजलगाव, मंजरथ आणि मोगरा या भागांमध्ये तर अक्षरशः पाण्याने धुमाकूळ घातला आहे. शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग यांसारखी खरीप पिके पूर्णपणे जलमग्न झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी तलावासारख्या दिसत आहेत. मेहनतीने उभं केलेलं पीक वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांना हताश व्हावं लागत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










