हरभऱ्याच्या फुलोऱ्यात तुमच्या या चुका पडतील महागात, पीक होईल मातीमोल, एक्सपर्टने सांगितलं त्यामागचं कारण

Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या हरभऱ्याची पेरणी वेगाने सुरू आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक विश्वासार्ह आणि नफा देणारे पीक म्हणून हरभरा ओळखले जाते.
1/6
Agriculture News
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या हरभऱ्याची पेरणी वेगाने सुरू आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक विश्वासार्ह आणि नफा देणारे पीक म्हणून हरभरा ओळखले जाते. मात्र पेरणीपूर्वी आणि वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांत थोडीशीही निष्काळजीपणा झाल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे योग्य नियोजन, वेळेवर सिंचन आणि कृषी एक्सपर्टच्या सूचनांनुसार शेती केल्यास हरभरा उत्पादन दुप्पट होण्याचीही शक्यता आहे.
advertisement
2/6
agriculture
एक्सपर्टचं म्हणणं काय आहे? -  त्याचं म्हणणं आहे की, हरभरा हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक असले तरी त्याची वाढ अतिशय संवेदनशील असते. विशेषतः फुलोऱ्याचा कालावधी हा संपूर्ण पिकासाठी सर्वात महत्वाचा टप्पा असतो. या काळात सिंचन केल्याने झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. चुकीचे किंवा अति सिंचन केल्यामुळे हरभऱ्याला फुले आणि शेंगा येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे एकूण उत्पादनात मोठी घट दिसून येते.
advertisement
3/6
हरभऱ्याला सिंचन कधी आणि किती वेळा करावे?
हरभऱ्याला सिंचन कधी आणि किती वेळा करावे? -   एक्सपर्टच्या मते, पेरणीनंतर पहिले सिंचन साधारण 20 ते 25 दिवसांनी करणे आवश्यक असते. यामुळे रोपांची मुळे मजबूत होतात आणि झाडांची वाढ गतीमान होते. शेतात पाण्याची उपलब्धता असल्यास दुसरे सिंचन 35 ते 45 दिवसांनी करता येते. मात्र यानंतर फुलोऱ्याच्या टप्प्यात सिंचन पूर्णपणे बंद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या काळात पाणी दिल्यास फुले गळून पडतात, शेंगा कमी येतात आणि उत्पादनात थेट घट दिसून येते.
advertisement
4/6
agriculture
फुलांच्या टप्प्यात पाणी देण्याची चूक अनेक शेतकरी नकळत करतात. या अवस्थेत पाण्याचा संपर्क झाला तर फुलांची वाढ थांबते, फुलगळ होते आणि झाडे बोंड देण्यास कमी प्रतिसाद देतात. त्यामुळे शेवटचे सिंचन नेहमी फुले येण्यापूर्वीच करावे. पुढे, जर पाणी फारच कमी असेल आणि शेत कोरडे दिसू लागले तर 75 ते 80 टक्के शेंगांची निर्मिती झाल्यानंतर मर्यादित प्रमाणात शेवटचे सिंचन करता येते. या वेळचे पाणी पिकाला सुरक्षित ठेवते आणि उर्वरित शेंगा योग्य पद्धतीने वाढण्यास मदत करते.
advertisement
5/6
agriculture
हरभरा कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांना जास्त सिंचनाची गरज नसते. परंतु योग्य वेळ जाणून पाणी दिल्यास उत्पादनात किमान 20  ते 30 टक्क्यांनी वाढ शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन आणि पिकाच्या टप्प्यानुसार काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
advertisement
6/6
agriculture news
एकंदरीत, रब्बी हंगामातील सर्वाधिक फायदेशीर पिकांपैकी एक असलेल्या हरभऱ्यात चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर फुलोऱ्याच्या टप्प्यात सिंचन टाळणे, पेरणीनंतर योग्य अंतराने पाणी देणे आणि शेत कोरडे पडल्यासच शेवटचे पाणी करणे. या तीन बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापन आणि अगदी छोट्या चुका टाळल्यास शेतकरी हरभऱ्यापासून भरघोस नफा कमावू शकतात.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement