Rain Vs Cars:..तेंव्हा कारचं टायर हे रस्ता सोडून हवेत असतं, पावसाळ्यातली सगळ्यात डेंजर थेअरी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही पावसामध्ये भरधाव कार चालवत असाल तर आताच ब्रेक मारा. कारण, पाण्यामध्ये तुमच्या कारचं टायर हे रस्त्याच्या संपर्कातून बाजूला होतं अन् काही कळायच्या आत कार पलटी होते.
गेल्या अनेक दशकांमध्ये पावसाला जून महिन्याच्या आधीच सुरुवात झाल्यामुळे वातावरण अचानक आल्हादायक झालं आहे. राज्यभरात दूरपर्यंत पाऊस धारा बरसत आहे. पण पाऊस जितका आल्हादायक जरी वाटत असला तरी तो तितकाच संकटात सुद्धा आणू शकतो. पावसाळ्यामध्ये अपघात आणि दुर्घटनेमध्ये वाढ होत असते. अशातच जर तुम्ही पावसामध्ये भरधाव कार चालवत असाल तर आताच ब्रेक मारा. कारण, पाण्यामध्ये तुमच्या कारचं टायर हे रस्त्याच्या संपर्कातून बाजूला होतं अन् काही कळायच्या आत कार पलटी होते.
advertisement
advertisement
advertisement
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, ॲक्वाप्लॅनिंग (Aquaplaning) आणि हायड्रोप्लॅनिंग (Hydroplaning). आता या प्रकारामध्ये पावसात रस्त्यावर पाणी साचलेलं असतं. अशावेळी जेव्हा कार वेगाने या पाण्याच्या थरावरून जाते, तेव्हा टायर आणि रस्त्यामधील पाण्याचा दाब इतका वाढतो की, टायरचा रस्त्याशी संपर्क तुटतो. यामुळे टायर रस्त्यावर 'तरंगू' लागतं आणि गाडीवरील नियंत्रण सुटतं. हीच परिस्थिती ॲक्वाप्लॅनिंग. अशा वेळी ब्रेक दाबलं किंवा अचानक स्टिअरिंग फिरवली तर गाडी घसरून पलटी होण्याची दाट शक्यता असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement