शुन्यातून ब्रँड बनवणारा उद्योजक, पहिल्या दिवशीची कमाई 9 रुपये, आता पुण्यात 29 शाखा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यातील खत्री बंधू आईस्क्रीम वाल्यांची ही कहाणी नव्याने व्यवसायात उतरू पाहणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
advertisement
advertisement
गिरीश खत्री यांनी 1989 साली आईस्क्रीमच्या व्यवसायात पदार्पण केले. एकत्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडिलांना मदत करायची म्हणून गिरीश आईसक्रीम बनवायला शिकले. त्यांचे मामा देखील आईस्क्रीम बनवायचे. त्यामुळे त्यांना मामांचे मार्गर्शन मिळाले. आईच्या मदतीने पैशांची जुळवाजूळव करून त्यांनी हा व्यवसाय उभारला.
advertisement
पहिल्या दिवशीची विक्री 9 रुपये होती. पण तरीही न डगमगता हा व्यवसाय सुरु ठेवला. 'माउथ पब्लिसिटी'मुळे लोकं जोडली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मागणी वाढली. पुढे त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट सुरु केले. आज पुण्यात 29 ठिकाणी आम्ही विक्री करतो तसेच पुण्याच्या बाहेरही पुरवठा करतो, असे खत्री बंधू आईस्क्रीमचे गिरीश खत्री सांगतात.
advertisement
पहिल्यांदा घराशेजारी विठ्ठल मंदिराच्या बाजूला व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशीची आमची विक्री 9 रुपये होती, त्यानंतर ग्राहकांच्या सूचना येत गेल्या. त्याच आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यांची दखल घेत आम्ही बदल करत गेलो आणि आमचा एक फॉर्म्युला तयार झाला. हाच फॉर्म्युला आज लोकांना आवडत आहे, असं गिरीश सांगतात.
advertisement
advertisement


