Actor Life: बॉलिवूड सोडलं, एका घटनेनं होत्याचं नव्हतं झालं; फेमस अभिनेत्यावर आलेली ढाब्यावर भांडी घासायची वेळ

Last Updated:
Actor Life: हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते जे प्रसिद्धीसाठी नाही पण अभिनयासाठी जगतात. आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र वडिलांच्या निधनाने त्यांचं आयुष्य पूर्णच कोलमडून गेलं आणि ते वेगळ्याच ट्रॅकवर गेले.
1/7
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते जे प्रसिद्धीसाठी नाही पण अभिनयासाठी जगतात. आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र वडिलांच्या निधनाने त्यांचं आयुष्य पूर्णच कोलमडून गेलं आणि ते वेगळ्याच ट्रॅकवर गेले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते जे प्रसिद्धीसाठी नाही पण अभिनयासाठी जगतात. आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र वडिलांच्या निधनाने त्यांचं आयुष्य पूर्णच कोलमडून गेलं आणि ते वेगळ्याच ट्रॅकवर गेले.
advertisement
2/7
कधी 'गोलमाल'मधला विनोदी आदमी तर कधी 'आँखों देखी'मधला गंभीर बाबूजी साकारून यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आपण बोलत असलेले हे अभिनेते आहेत, संजय मिश्रा.
कधी 'गोलमाल'मधला विनोदी आदमी तर कधी 'आँखों देखी'मधला गंभीर बाबूजी साकारून यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आपण बोलत असलेले हे अभिनेते आहेत, संजय मिश्रा.
advertisement
3/7
संजय मिश्रा यांचा अभिनय तर सर्वांनाच माहितीय मात्र त्यांचं स्ट्रगल फार कमी लोकांना माहित आहे. संजय मिश्रा यांचा जन्म दरभंगा (बिहार) येथे झाला. त्यांचे वडील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये काम करत होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांनी बनारस आणि दिल्ली येथे शिक्षण घेतले. मात्र, अभ्यासात त्यांना रस नव्हता. त्यांना नेहमी रंगभूमीकडे ओढ होती. म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) प्रवेश घेतला.
संजय मिश्रा यांचा अभिनय तर सर्वांनाच माहितीय मात्र त्यांचं स्ट्रगल फार कमी लोकांना माहित आहे. संजय मिश्रा यांचा जन्म दरभंगा (बिहार) येथे झाला. त्यांचे वडील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये काम करत होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांनी बनारस आणि दिल्ली येथे शिक्षण घेतले. मात्र, अभ्यासात त्यांना रस नव्हता. त्यांना नेहमी रंगभूमीकडे ओढ होती. म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) प्रवेश घेतला.
advertisement
4/7
1995 मध्ये संजय मिश्रा यांना टीव्हीवरील “ऑफिस ऑफिस” मालिकेतून ओळख मिळाली. त्यानंतर “सत्या”, “दिल से”, “गोलमाल”, “धमाल” यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. पण एक काळ असा आला की आयुष्यात सर्व काही थांबल्यासारखं झालं.
1995 मध्ये संजय मिश्रा यांना टीव्हीवरील “ऑफिस ऑफिस” मालिकेतून ओळख मिळाली. त्यानंतर “सत्या”, “दिल से”, “गोलमाल”, “धमाल” यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. पण एक काळ असा आला की आयुष्यात सर्व काही थांबल्यासारखं झालं.
advertisement
5/7
वडिलांच्या निधनानंतर संजय मिश्रा खूप खचले. त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशमध्ये एका ढाब्यावर काम सुरू केलं. तेथे ते नूडल्स बनवायचे, ऑम्लेट विकायचे आणि भांडी धुवायचे. दिवसाला फक्त 150 रुपये मिळायचे. त्या काळात त्यांनी स्वतःला पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवलं.
वडिलांच्या निधनानंतर संजय मिश्रा खूप खचले. त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशमध्ये एका ढाब्यावर काम सुरू केलं. तेथे ते नूडल्स बनवायचे, ऑम्लेट विकायचे आणि भांडी धुवायचे. दिवसाला फक्त 150 रुपये मिळायचे. त्या काळात त्यांनी स्वतःला पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवलं.
advertisement
6/7
संजय मिश्रा यांना अचानक एक दिवस दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा फोन आला. त्यांनी “ऑल द बेस्ट” या चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. सुरुवातीला संजय मिश्रा तयार नव्हते, पण शेवटी त्यांनी मुंबईत परत येऊन ती भूमिका केली. या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा नवं वळण दिलं.
संजय मिश्रा यांना अचानक एक दिवस दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा फोन आला. त्यांनी “ऑल द बेस्ट” या चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. सुरुवातीला संजय मिश्रा तयार नव्हते, पण शेवटी त्यांनी मुंबईत परत येऊन ती भूमिका केली. या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा नवं वळण दिलं.
advertisement
7/7
संजय मिश्रा नेहमी म्हणतात, 'अभिनय हे माझ्यासाठी काम नाही, ते ध्यान आहे.' म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेत सत्यता आणि भावना दिसते. “आँखों देखी”, “मसान”, “कडवी हवा”, “भक्षक” आणि “गोलमाल” मालिकेत त्यांनी दाखवलेला अभिनय याचा पुरावा आहे. “आँखों देखी”साठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला. तसेच, “कडवी हवा”साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं कौतुक झालं.
संजय मिश्रा नेहमी म्हणतात, 'अभिनय हे माझ्यासाठी काम नाही, ते ध्यान आहे.' म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेत सत्यता आणि भावना दिसते. “आँखों देखी”, “मसान”, “कडवी हवा”, “भक्षक” आणि “गोलमाल” मालिकेत त्यांनी दाखवलेला अभिनय याचा पुरावा आहे. “आँखों देखी”साठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला. तसेच, “कडवी हवा”साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं कौतुक झालं.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement