Grapes : द्राक्षावरील पांढरा थर हा नैसर्गिक मेण आहे की घातक कीटकनाशक? खाण्यापूर्वी साफ करण्याची ही आहे योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भीतीपोटी काही लोक द्राक्षं खाणंच टाळतात किंवा नुसत्या पाण्याने धुवून ती खातात. पण या पांढऱ्या थरामागे नेमकं विज्ञान काय आहे आणि ती स्वच्छ करण्याची 'योग्य' पद्धत कोणती, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारपेठेत रसाळ आणि गोड द्राक्षांच्या टोपल्या सजलेल्या दिसू लागतात. हिरवी, काळी किंवा गुलाबी रंगाची द्राक्षं पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. पण द्राक्षं विकत घेताना आपल्या सर्वांच्या मनात एक शंका नेहमीच डोकावते. ती म्हणजे द्राक्षांच्या घडावर असलेला तो 'पांढरा थर'.
advertisement
अनेकदा आपण द्राक्षं हातात घेतो तेव्हा बोटांना तो पांढरा पावडरसारखा थर लागतो. मनात विचार येतो की, हे रासायनिक कीटकनाशक तर नाही ना? की द्राक्षं ताजी दिसावीत म्हणून यावर काही फवारलंय? भीतीपोटी काही लोक द्राक्षं खाणंच टाळतात किंवा नुसत्या पाण्याने धुवून ती खातात. पण या पांढऱ्या थरामागे नेमकं विज्ञान काय आहे आणि ती स्वच्छ करण्याची 'योग्य' पद्धत कोणती, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
हा थर नैसर्गिक का असतो?द्राक्षांचं पीक जसं मोठं होतं, तसं निसर्ग स्वतःहून या फळावर मेणासारखा एक पातळ थर तयार करतो. याचे दोन मुख्य फायदे असतात:ओलावा टिकवणे: हा थर द्राक्षांच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ देत नाही, ज्यामुळे द्राक्षं जास्त काळ टवटवीत आणि रसाळ राहतात.संरक्षण: हा नैसर्गिक थर द्राक्षांना बुरशी, बॅक्टेरिया आणि बाह्य की लोकांपासून वाचवतो.
advertisement
कीटकनाशक कसं ओळखायचं?जर हा पांढरा थर संपूर्ण द्राक्षावर एकसारखा पसरलेला असेल आणि तो पुसल्यावर सहज निघत असेल, तर तो नैसर्गिक 'ब्लूम' आहे. मात्र, जर द्राक्षांवर पांढऱ्या रंगाचे वेडेवाकडे ठिपके किंवा थेंबांचे सुकलेले डाग दिसत असतील, तर ती कीटकनाशकाची (Pesticides) उर्वरित मात्रा असू शकते. आजच्या काळात शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे काळजी घेणं केव्हाही उत्तम.
advertisement
द्राक्षं नुसत्या पाण्याखाली धुणं पुरेसं आहे का?बहुतेक लोक द्राक्षं नळाच्या पाण्याखाली धरतात आणि खातात. पण द्राक्षांची रचना ही घट्ट घडाची असते. दोन द्राक्षांच्या मध्ये असलेल्या जागेत धूळ, सूक्ष्म जीव आणि कीटकनाशकांचे अंश अडकलेले असू शकतात, जे साध्या पाण्याने पूर्णपणे निघत नाहीत. जर ही रसायनं शरीरात गेली, तर अन्नातून विषबाधा (Food Poisoning), पोटदुखी किंवा दीर्घकाळात इतर गंभीर आजार होऊ शकतात.
advertisement
advertisement
कृती:1. घडापासून द्राक्षं वेगळी करा: सर्वात आधी द्राक्षांच्या मुख्य देठापासून छोटी छोटी द्राक्षं वेगळी करा. यामुळे प्रत्येक द्राक्षापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल.2. पाण्यात भिजवा: एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्या आणि त्यात ही द्राक्षं टाका.3. बेकिंग सोडा आणि मीठ: या पाण्यात 1 मोठा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा मीठ टाका. बेकिंग सोडा कीटकनाशकांचे अंश काढून टाकण्यास मदत करतो, तर मीठ जंतूंचा नाश करतं.4. 5-10 मिनिटे तसेच ठेवा: द्राक्षं या मिश्रणात 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवा. जास्त वेळ ठेवू नका, अन्यथा ती मऊ पडू शकतात.5. हळुवार घासून धुवा: हाताने हलक्या हाताने द्राक्षं चोळा. यामुळे तो पांढरा थर आणि रसायने सुटी होतील.6. स्वच्छ पाण्याने धुवा: शेवटी द्राक्षं बाऊलमधून काढून वाहत्या स्वच्छ पाण्याखाली (Running Water) 2-3 वेळा धुवून घ्या.
advertisement
खाण्यापूर्वीच धुवा: द्राक्षं आणल्या आणल्या धुवून फ्रिजमध्ये ठेवू नका. ओलाव्यामुळे ती लवकर सडतात. जेव्हा खायची असतील, तेव्हाच वरील पद्धतीने धुवा.व्हिनेगरचा वापर: जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल, तर तुम्ही पाण्यामध्ये थोडा 'व्हिनेगर' टाकूनही द्राक्षं स्वच्छ करू शकता.देठ काढून नका: द्राक्षं धुताना त्याचं देठ एकदम मुळापासून उपटू नका, अन्यथा रसायनेयुक्त पाणी द्राक्षाच्या आत शिरू शकतं.
advertisement










