Interesting Facts : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? कधी आणि कशी सुरु झाली ही प्रथा? वाचा रंजक कारण
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Why kites are flown on Makar Sankranti : मकर संक्रांती म्हणलं की तिळगूळ, गोडधोड आणि आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी डोळ्यांसमोर येते. भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची खास परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या दिवशी छतावर किंवा मोकळ्या मैदानात जमून पतंगबाजीचा आनंद घेतात. पण ही परंपरा नेमकी कशी आणि का सुरू झाली, यामागे कोणते रहस्य दडलेले आहेत, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
मकर संक्रांतीचा काळ हिवाळ्यात येतो, जेव्हा थंडीमुळे शरीर सुस्त झालेलं असतं. अशा वेळी पतंग उडवण्यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारण आहे. सकाळी आणि दुपारच्या वेळची कोवळी सूर्यकिरणं शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने लोक बराच वेळ उन्हात घालवतात, ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन-डी मिळतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








