800 वर्ष जुनी विहीर, पायऱ्यावर उभं राहिलं तर वाटेल राजवाड्यात आलो! महाराष्ट्रात कुठे आहे माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
साधी विहीर म्हणावं तर तिचं सौंदर्य पाहून क्षणभर राजवाड्यात उभं असल्याचा भास होतो. इतिहास अभ्यासकांच्या मते, या विहिरीचा कालावधी तब्बल 800 ते 900 वर्षांपूर्वीचा आहे.
महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक ठेवे आजही शांतपणे आपला भूतकाळ जपून आहेत. त्यापैकीच एक अनोखी आणि दुर्लक्षित वास्तू म्हणजे दर्यापूर तालुक्यातील महिमापुर गावातील पायरी विहीर. साधी विहीर म्हणावं तर तिचं सौंदर्य पाहून क्षणभर राजवाड्यात उभं असल्याचा भास होतो. इतिहास अभ्यासकांच्या मते, या विहिरीचा कालावधी तब्बल 800 ते 900 वर्षांपूर्वीचा आहे.
advertisement
महिमापुर गावाच्या मध्यभागी असलेली ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चौकोनी आकाराची आणि सुमारे 80 फूट खोल असलेली ही विहीर जवळपास 40 मीटर रुंद आहे. तिच्या भिंतींवर मध्यप्रदेशातून आणलेल्या तांबूस दगडाचा वापर करण्यात आला असून काही ठिकाणी काळ्या दगडाचाही समावेश आहे.
advertisement
advertisement
advertisement
या सर्व रचनेमुळे ही विहीर एखाद्या भूमिगत राजवाड्यासारखी भासते. या विहिरीच्या उगमाबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ही विहीर देवगिरीच्या यादवकालीन आहे, तर काहींच्या मते ती बहामनी काळातील असावी. प्रा. डॉ. संतोष बनसोडे यांच्या मते, यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर या मार्गावर अनेक विहिरी बांधण्यात आल्या होत्या आणि महिमापुरची विहीर त्यापैकीच एक असण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement








