Weather Alert: वारं फिरलं! मराठाड्यात पुन्हा धो धो पाऊस, छ. संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकत असून मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्यात देखील अशीच काहीशी स्थिती असली तरी आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्यात देखील अशीच काहीशी स्थिती असली तरी आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
बुधवारी मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे.
बुधवारी मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
बीड, धाराशीव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्हांना हवामान विभागाने पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तरीही या ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे.
बीड, धाराशीव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्हांना हवामान विभागाने पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तरीही या ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
बुधवारी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये तर दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार याठिकाणी जोरदार पाऊस झाला असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस शेतातच काळवंडला असून रब्बी पेरण्या रखडल्या आहेत
बुधवारी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये तर दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार याठिकाणी जोरदार पाऊस झाला असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस शेतातच काळवंडला असून रब्बी पेरण्या रखडल्या आहेत
advertisement
5/5
दरम्यान, आजपासून मराठवाड्याच्या हवामानात पुन्हा बदल जाणवणार आहेत. पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आजपासून मराठवाड्याच्या हवामानात पुन्हा बदल जाणवणार आहेत. पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement