Weather Update: समुद्र खवळला, वारं फिरलं आता 5 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम, या जिल्ह्यांसाठी अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरबी समुद्र, पश्चिम बंगाल, विदर्भ, कोकण, रत्नागिरी, जळगाव, भंडारा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, वाशीम, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट.
अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे विदर्भासोबत कोकण किनारपट्टीवर भागात पाऊस कायम आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रत्नागिरी, जळगाव, भंडाऱ्यात मोठं नुकसान झालं आहे. पिक काढल्यानंतर पाऊस आल्यानं शेतात काढून ठेवलेलं पिक पाण्याखाली गेलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


